अभ्यास

पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध – Pruthviche Manogat Marathi Nibandha

Autobiography of the Earth In Marathi

पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध (Pruthviche Manogat Marathi)

उन्हाळ्याच्या सुट्टीत मस्ती करायला मामाच्या, मावशीच्या गावाला जायला, इकडे तिकडे फिरायला सर्वांनाच आवडते. पण मला डोंगरांवर भटकायला खूप आवडते. एकदा असेच भटकत भटकत मी माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी गेलो. वडाचे झाड… विस्तृत पसरलेल्या चहूबाजूंना पारंब्या… थंडगार सावली ! मी जमिनीवर झोकून दिले. कितीतरी वेळ मी तसेच जमिनीवर पडून राहिलो. वर अफाट आभाळ पसरले होते. मनात येऊ लागले… काय असेल हे आभाळ म्हणजे? कसे असेल ते? हे झाड, ही माती, ही लहान मोठी दगड… हा डोंगर कुठून आले? ही आपली पृथ्वी कशी निर्माण झाली असेल? आपली पृथ्वी व तिच्या सारखे ग्रह सूर्याभोवती फिरतात. असे अब्जावधी सूर्य मिळून आकाश गंगा बनते… असे अनेक प्रश्न, या संपूर्ण विचारचक्राने डोळ्यावर झापडाच येऊ घातली.

इतक्यात जमिनीतून आवाज आला… अरे बाळा मी पृथ्वी बोलत आहे. मी पृथ्वी, तुमची धरणी, अवनी, वसुंधरा. किती नावे दिली आहेत तुम्ही मला! आता तू विचार करत होतास ना तो कळला मला. म्हटले तुला थोडी माहिती द्यावी म्हणून तुझ्याशी बोलायला मी आले.

तुला मी माझीसंपूर्ण जीवन कहाणी सांगून कंटाळा आणणार नाही. तरीपण… तुला ठाऊक आहे का माझे वय काय आहे? नाही ना? मग ऐक तर थोडी. थोडकी नव्हे तब्बल पाचशे कोटी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. सुरुवातीला मी तप्त वायू चा गोळा होते. हळूहळू वायू थंड होत गेले आणि मला भरीव आकार येत गेला. कालांतराने येथे पाणी निर्माण झाले. पाण्यामुळे हळूहळू सजीवांची निर्मिती झाली. एका मागो माग सर्व सजीव सृष्टी निर्माण झाली. सर्वच जीवन एकमेकांशी घट्टपणे बांधलेल गेले. सर्व सजीवांच्या जीवन जाळ्याला निर्जीव वस्तूही जोडल्या गेल्या. हे सर्व इतकं एकरूप झालेलं आहे की या सृष्टीतला एक घटक जरी नष्ट झाला तर दुसऱ्याच्या जगण्यावर परिणाम होणार.

नुसती कल्पना तर करून बघ. सगळी वनस्पती सृष्टी एकाएकी अदृश्य झाली तर काय होईल? तर शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मरून जातील, बरोबर ना? मग मांसाहारी प्राण्यांचे काय, जे माणसाप्रमाणे मांसाहार व शाकाहार दोन्ही करतात त्यांचे काय? सर्व प्राणी एकमेकांना खाऊन संपून टाकतील. नाही का? असं घडलं तर संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईन जाईल.

हे मी तुला सांगत आहे, याचे कारण म्हणजे? माणसानेच आज त्याच्या सर्व नाशाची वेळ स्वतःवर ओढवून घेतली आहे. बुद्धीच्या जोरावर रोगराई वर मात करून माणसाने आपलं आयुष्य वाढवलं आणि मृत्यूचं प्रमाण कमी झालं. सहाजिकच लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येला राहण्याची सोय होण्यासाठी बेसुमार जंगलतोड केली. वनस्पती नष्ट झाल्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ लागली व श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. वनस्पती नष्ट झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे प्राणी नष्ट झाले. सजीवांच्या साखळीतील एक एक प्राणी नष्ट होत आहे, त्याचे गंभीर परिणाम बाकीच्या सजीवांना भोगावे लागत आहेत. माणूस आधुनिक जीवनशैली निर्माण करण्याच्या नादात निसर्गापासून खूप दूर गेला आहे.

जलप्रदूषण, वायू प्रदूषण, भूप्रदूषण अशा प्रदूषणामुळे माणसाने निसर्गावर अनन्वित अत्याचार सुरू केले आहेत. मी हे सारे हतबल होऊन पाहत बसले आहे. सुमारे दोनशे लाख वर्षापूर्वी माणसाची उत्पत्ती झाली. तो माणूस स्वतः हळू हळू नाशाच्या दिशेने चालला आहे. माणसाला वाचवायचे असेल तर आणि त्याला जगायचे असेल त्याने पृथ्वीवर म्हणजेच माझ्यावर जे अत्याचार सुरू आहेत ते थांबवले पाहिजेत.

“तू पोहोचवशील का माझा हा संदेश सर्व माणसांपर्यंत?” जमीन किंचित थरथरली आणि मी घाबरून जागा झालो. त्या स्वप्नातील प्रसंगाने मी अजूनही अस्वस्थ झालो आहे.

अजून काही मराठी निबंध –

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button